बुधवार, २७ जून, २०१८

अति उत्साह अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स

अति उत्साह अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स...

      काही वेळा माणूस अति उत्साहाच्या भरात असे काही कृत्य करायला जातो की तो सर्वांसमोर तोंडावर कधी पडतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.एखाद्याला कमी लेखण्याच्या व पाय खेचण्याच्या या रस्सी खेच मध्ये त्याच्या कमरेचा चुराडा कधी झाला हे न कळण्या इतका बेभान होणारा त्याच्यासारखा अति शहाणा तोच असतो.काहीही कारण नसताना स्वतःचे नाकर्तेपण लापवताना त्याची तारेवरची केविलवाणी कसरत बघून खरंच त्याची कीव येते व हसूही... मी म्हणतो असे का व्हावे? कितीही रक्तबंबाळ झाले तरी हा आटापिटा कशासाठी आणि कोणासाठी?... हे फक्त नावासाठी होत असेल तर ते तुम्हाला अशा मार्गाने कधीच शक्य होणार नाही.त्यासाठी अंगात तशी धमक असावी लागते.जवळ आलेली माणसं तोडण्याचा नव्हे जोडण्याचा गुण असावा लागतो.तोंडात मधाळ भाषा असावी लागते.तेव्हा दूर असलेली माणसं जवळ येतात.आपुलकीने जवळ घेतात.आणि यासाठी गरज असते ती आपल्यातील कर्तृत्व गुणाची आणि तो असा हिसकावून किंवा दिखावा करून मिळत नसून तो रक्तात असावा लागतो, त्याच्यासाठी माणसाबरोबर एकरूप व्हावं लागतं, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्या लागतात... म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात "तेथे पाहिजे जातीचे, हे काम नोहे येरा गबाळ्याचे."

©शब्दांकन : पाटोळे R.B.
मो.नं.7028255007.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा