बुधवार, २७ जून, २०१८

किस्सा...

पारनेर-नगर एसटी मधील एक मनाला भिडलेला किस्सा... एकदा वाचाच...

दिनांक १९ जून २०१८ ची घटना आहे.दुपारी दीड वाजताच्या पारनेर(सुपा मार्गे) नगर एस टी गाडीने नगरला येत होतो. गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती.गाडी केडगावच्या जवळ आली आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबले.गाडी थांबली गाडीत चार पाच इसम चढले. ते एसटीचे अधिकारी होते त्यांनी प्रवाश्यांची तिकिटे चेक करायला सुरुवात केली.सर्व प्रवाश्यांनी पटापट तिकिटे काढून दाखवली.त्यातील एक अधिकारी माझ्या सीटजवळ आला मीही तिकीट दाखवले.त्यांनी माझ्या बाजूच्या व्यक्तीला तिकीट म्हणून विचारले. बाजूचा व्यक्ती इन शर्ट केलेला. पायात छान बूट असलेला एक रुबाबदार तरुण होता.त्यांनी तिकीट विचारताच तो तरुण स्टाफ म्हणाला आणि गप्पा झाला.अधिकाऱ्याने त्या तरुणाला वरपासून खालपर्यंत नखशिखांत न्याहाळला व स्लिप दाखव म्हणाला. तरुणाने स्लिप दाखवली.स्लिप बघून त्या अधिकाऱ्याला काय खटले काय माहीत.तो म्हणाला काय जहागिरदाराची औलाद आहे का? बापाची गाडी असल्यासारखा फिरतो? आम्ही आल्यावर साधं उठून उभा राहता येत नाही का? असे म्हणून सर्व प्रवाश्यांसमोर आपल्याच स्टाफचा असा आगे तुगे बोलून अपमान करणारा अधिकारी मी पहिल्यांदा पहिला.एवढ्या लोकांत अपमान होत असून सुद्धा त्या तरुणाने पुन्हा पुन्हा सॉरी म्हणून त्या अधिकाऱ्यांची माफी मागितली.परंतु अधिकाऱ्याने आपली मुजोरीची भाषा तशीच सुरू ठेवली. त्या कर्मचाऱ्याला कार्यवाहीची धमकी देऊन त्याच्या स्लीपवरील नाव लिहून नेले.व तणतणत निघून गेला.
      मी विचार करू लागलो की त्या तरुणाचे नेमके काय चुकले असावे बरे म्हणून एवढा अपमान होऊनही त्यानेच माफी मागितली.म्हणजे आजही वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव प्रत्येक क्षेत्रात आहे.आजही वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ कर्मचाऱ्याला गुलाम म्हणूनच वागवतात.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मी त्या तरुणाला त्याचे नाव विचारले त्याने अतिशय नम्रपणे आपले नाव सांगितले. बहुधा तो ड्युटी संपवून घरी निघाला असावा.त्या अधिकाऱ्याचेही नाव मी जाणून घेतले.
अधिकाऱ्याचे नाव : सुभाष गवळी
तरुणाचे नाव : पारनेर डेपो मध्ये कंडक्टर असलेले अभिमान गायकवाड होय.

बघा यातलं कुणी तुमच्यात ओळखीचं आहे काय किंवा तुम्हीही त्या एसटीचे प्रत्यक्षदर्शी प्रवासी आहात काय.

©शब्दांकन : राम भिमराव पाटोळे(RBP)

मो.नं.7028255007.

अति उत्साह अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स

अति उत्साह अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स...

      काही वेळा माणूस अति उत्साहाच्या भरात असे काही कृत्य करायला जातो की तो सर्वांसमोर तोंडावर कधी पडतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.एखाद्याला कमी लेखण्याच्या व पाय खेचण्याच्या या रस्सी खेच मध्ये त्याच्या कमरेचा चुराडा कधी झाला हे न कळण्या इतका बेभान होणारा त्याच्यासारखा अति शहाणा तोच असतो.काहीही कारण नसताना स्वतःचे नाकर्तेपण लापवताना त्याची तारेवरची केविलवाणी कसरत बघून खरंच त्याची कीव येते व हसूही... मी म्हणतो असे का व्हावे? कितीही रक्तबंबाळ झाले तरी हा आटापिटा कशासाठी आणि कोणासाठी?... हे फक्त नावासाठी होत असेल तर ते तुम्हाला अशा मार्गाने कधीच शक्य होणार नाही.त्यासाठी अंगात तशी धमक असावी लागते.जवळ आलेली माणसं तोडण्याचा नव्हे जोडण्याचा गुण असावा लागतो.तोंडात मधाळ भाषा असावी लागते.तेव्हा दूर असलेली माणसं जवळ येतात.आपुलकीने जवळ घेतात.आणि यासाठी गरज असते ती आपल्यातील कर्तृत्व गुणाची आणि तो असा हिसकावून किंवा दिखावा करून मिळत नसून तो रक्तात असावा लागतो, त्याच्यासाठी माणसाबरोबर एकरूप व्हावं लागतं, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्या लागतात... म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात "तेथे पाहिजे जातीचे, हे काम नोहे येरा गबाळ्याचे."

©शब्दांकन : पाटोळे R.B.
मो.नं.7028255007.